२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...
आज होळी .. म्हणजेच शिमगा.. होळी हा सण कि उत्सव? त्या विषयी नेमकी अशी माहिती द्या असे अनेकांनी सूचित केले होते. *डॉ. अशोक राणा लिखित "सणांची सत्यकथा"* या पुस्तकातील होळी विषयी थोडी माहिती इथे देतं आहे. हे पुस्तके सर्वांनी वाचावे असा आग्रह माझा आहे. इथे संपूर्ण लेख न देता त्यातील काही भाग देतं आहे याची नोंद घ्यावी. प्रत्येकाला आपली मुळे शोधता आली पाहिजेत. त्यासाठी शोध घेता यायला पाहिजे. उत्सवांमधून समूहभावना व्यक्त होते. तसेच बदलत्या संदर्भाचे कोंदण उत्सवाच्या स्वरूपाला नवेपण आणते. म्हणून अनेक सण-उत्सव बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भातही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्या बदलत्या स्वरूपातही त्यामागील हेतू मात्र व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. होळी हा कोणत्यातरी प्रवृत्तीचा निषेध करणारा उत्सव तसेच सणही आहे. उत्सव सामूहिकपणे, तर सण हे व्यक्तिगत स्वरूपात कुटुंबात साजरे करायचे असतात. होळीच्या सणाला शिमगा म्हणूनही संबोधतात. शिमगा करणे म्हणजे निषेध करणे असा वाक् प्रयोग मराठीत आहे. शिमग्यालाच गोव्यामध्ये 'शिगमा' असेही म्हणतात. होळीच्या सणामागी...
आज ३० जानेवारी २०२२. मोहनदास करमचंद गांधी,म्हणजे भारताचे बापू, महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन.असंख्य प्रकारे आज त्यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी व मलीन करण्यासाठी प्रयत्न केले जातील,यात दुमत नाही. "माणूस मेला,की वैर संपत",म्हणणारे आज स्वतःचं गांधी हत्येच समर्थन करताना दिसतील व आपल्या विचारात गांधींना नथू बनून पुन्हा गोळ्या घालून कुटील हस्य चेहऱ्यावर दाखवतील.७० वर्षात इतकं धाडस निर्माण झालय,ते काय थोडय.. असो ! मी मात्र माझ्या कुवतीप्रमाणे (अर्थात् वैचारिक कुवत)इथ हा लेख प्रस्तुत करत आहे.याचं शीर्षक थोड हटके आहे.पण,संपूर्ण लेख आवर्जून वाचा हि विनंती आहे.उगाच अर्धवट तर्क वितर्क नकोत.मगच त्यातील विचार स्पष्ट होतील.तर चला सुरुवात करूया.. "बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"?? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ भारताला स्वातंत्र्य मिळून त्याची पंच्चहत्तरावी आपण २०२१-२२ मधे धूम धडाक्यात जगभर साजरी करत आहोत.देशाच्या स्वतंत्र्यं लढ्यात असंख्य भारतीयांनी आपल्या प्राणांची आहूती दिली,अनेकांनी शेवटच्या श्वासा पर्यंत स्वतंत्र्याचा नारा दिला,आपलं संपूर्ण जीवन भारतीयांनी येण...
Comments
Post a Comment