Posts

मंथन

Image
मंथन  कोणी ही कोणत्या ही स्त्री बाबत आक्षेपाहार्य विधान करण्यावर माझा नेहमीच विरोध असतो. याचा अर्थ कोणी टीकाच करू नये असं नाही. परंतु, आपल्या भाषेचा वापर आपले संस्कार दर्शवतं असतात हे तितकंच महत्वाचे. अनेकांना मी स्त्रीवादी वगेरे वाटते. अर्थात स्त्रीवादी असणं किंवा कोणी तसं आपल्याला म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाही. हो पण मी एकांगी स्त्रीवादी निश्चितच नाही ! ते baised म्हणतात ना, म्हणजे पक्षपाती वगेरे मी नाही. मी पूर्वग्रहदूषित तर अजिबात नाही. म्हणून जिथे जे व ज्याचे चूक त्याला विरोधच असतो. तसंच, स्त्रियांच्या बाबत ही काही सत्य आपण स्त्रियांनी स्वीकारायला पाहिजे. पुरुषीसत्ता आपण किती वाहून घ्यायची याची मर्यादा आपल्याला कधी समजलीच नाही. आपली प्रत्येक बाब या पुरुषांवर अवलंबून ठेवायची. का? असा प्रश्न कधी आपल्याला सतावत नाही का? जगात एकटं कोणी काहीच करतं नाही. माणूस म्हंटल की एकमेकांची मदत, आधार वगेरे असतोतच. किंबहुना ते असावंच. परंतु, त्यासाठी किती झुकतं माप घ्यावं, याला मर्यादा का नसावी? पण इथे पण  बघाना लिहिताना "माणूस" असं लिहिलं आहे मी. माणूस हा पुरुष लिंगीच शब्द आहे ना? मग इथ...

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

Image
कोरोना आणि लस - एक षडयंत्र  काही महिन्यांपूर्वी माझ्या परिचयातील एका डॉक्टरांनी (रिसर्च) माझ्यासोबत चर्चा करताना कोव्हीडला अनुसरून अनेक विषयांचा खुलासा केला होता.  त्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांविषयी सांगितलं होत. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंता त्यांनी व्यक्त केली होती. अनेक प्रकारचे आजार बळावतील, असं ही म्हणाले होते. त्यामधे कॅन्सर, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गुठुळ्या होणं या सारखे अनेक आजार अधिक तिव्र स्वरूपाचे असतील. कॅन्सरचे तर कोरोनासारखे variation's दिसतील ! म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे धोके वाढतील असं स्पष्ट केलं.    या मधे 12 वर्षावरील मुला मुलींना ही कोव्हीड लस टोचवण्याचा हलकटपणा केला गेला. यामुळे लहानमुलांना ही या संभव्य धोक्यांना सामोरं जावं लागेल. मुली महिला पिशवीच्या आजाराने (कॅन्सर) अधिक त्रस्त होतील. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे ही भवितव्य या मुळे धोक्यात आहे. यापेक्षा अधिक काय नुकसान कोरोनाच्या आड या हरामी लोकांनी करायचं राहिलं आहे सांगा?    1) घोड्यावाल्याला सरकार लस बनवायला देवूनच कशी शकते?  2) कोणती ही लस माण...

ज्योतिबा

Image
आज ११ एप्रिल,  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती/जन्मोत्सव 🙏🚩   ज्योतिबा आज तुम्ही समोर असता तर प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी  व्यक्त झाले असते. तरी, आपल्याला स्मरून व्यक्त होते.    दिवसागणिक ज्योतिबा तुमचे विचार व कार्य मेंदू आणिक मनात दृढ होत आहेत. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या पथावर घेवून येण्याचे अशक्य प्रयत्न आपण पूर्वत्वाला घेवून गेलात. आता त्यातून तुमचे पाईक म्हणून अनेकांनी आपले सवते सुभे मांडले आहेत. आम्ही कसे फुल्यांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असं असलं तरी तुमचे विचार मात्र त्यांच्या कृतीतून केव्हाच हद्दपार झाले आहेत.    ज्योतिबा तुम्ही आम्हा बहुजन वंचितांना बोटाला धरून शाळेत घेवून गेलात. अक्षर ओळख शिकता शिकता कधी मानव म्हणून आमची ओळख होवू लागली समजलंच नाही. थोडी बहुत समाजात आमची विचारणा होवू लागली. घराचा उंबरठा ओलांडून गगनभरारी घेवू लागलों. ज्योतिबा तुम्ही तुमच्या सावित्रीबरोबर कोट्यवधी सावित्रीच्या लेकींचे अस्तित्व निर्माण केले.  खोट्या व अनावश्यक रूढी परंपरेच्या भया...

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन

Image
ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने नवा इतिहास रचला. गुलामीत खितपत पडलेल्या, जीवनात शोषणचं वाट्याला आलेल्या बहुजनांना आपले स्वतःचे राज्य-रयतेचे राज्य, म्हणजेच स्वराज्य हे संघर्षातून निर्माण केले व बहाल केलं. असे स्वराज्य निर्माते, अद्वितीय व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज.    स्वराज्य मिळवण्यासाठी जो संघर्ष, जे बलिदान जिवंतपणी शिवरायांना द्यावे लागले, तेच स्वप्न त्यांच्या मृत्यूचे ही कारक बनले. आपल्या या राजाच्या कर्तृत्वशाली इतिहासात अनेक शूरवीर, वीरांगना, अठरापगड जाती, बारा बलुतेदार सर्व मावळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. म्हणूनच हा राजा रयतेचा राजा होता आणि राहिलं.    परंतु, खेदाची बाब की, राज्याच्या अस्तनींत स्वराज्यद्रोही, घातकी, फितूर, द्वेषी, कटकारस्थानी बांडगुळ भट आणि स्वकीय निखारे होते. त्यांनी अचूक वेळ साधली आणि घात केला. स्वराज्य पोरकं झालं.  आजचाच तो काळा दिवस. इतिहासाच्या पानातील हृदय पिळवटून टाकणारी, कधी ही कानी पडू नये अशी घटना.  ज्याच्या जीवनाची गाथा वाचून नियती ही ढाय मोकलून रडली असेल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला ...

भय

Image
भय  भय हा जीवितांचा शत्रू समजला जातो. भय/भीती आपल्याला बुद्धीहीन करते. भय निर्माण करून मूठभर स्वयंकेंद्रित, सत्ता पिपासूं, स्वतःला समाजाचे ठेकेदार समजणारे, असंवेदनशील नराधम समाजाचे विविधांगाने शोषण करतात. आपल्यामधे भीती अनेक प्रकारची असू शकते. यातील एक भीती आपल्याला कायमचे गुलाम बनवते. एक भीती नवा मार्ग निर्माण करण्यापूर्वीची असते.      आज चोहीकडे जी अंधाधुंदी सुरु आहे त्यामुळे मला प्रचंड भीती वाटते.. होय ! मला भीती वाटते. नकारात्मक दबावाला थोपवून धरण्याचे आपले प्रयत्न कमी पडत आहेत. याची सतत जाणिव होते. हतबल व्हायला होत. कुठे आणि कोणा कोणाला तोंड द्यायचं? हताश निराश होवून स्तब्ध होतो.. तेव्हा माझी मुलं समोर दिसतात. आपल्या आईच्या तालमीत वाढत, भविष्याला आत्मविश्वासाने गवसणी घालण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्याकडे बघून भीतीच्या बेड्या आपसूकच गळून पडतात. आपल्याकडे बघून येणारी पिढी लढण्यास सज्ज आहे. तर इतक्यात मला हार मानता येणार नाही. पुन्हा नव्या उमेदीने उभारी घेत भरारी घेते. मनात भीती असते. परंतु नवनिर्मितीचे भय इतिहास घडवू शकते ! या एका विचाराने घेतलेल्या भरारीत अधिक बळ न...

भारतीय संविधान दिन

Image
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन  करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे.     संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...

दोन शब्द आईसाठी 🤱💞

Image
दोन शब्द आईसाठी 🤱💞 माझ्यासारख्या निराकाराला आकार दिला.  परिव्यापक होण्याचे सामर्थ्य अंगी पेरले. आपला भरभक्क्म संघर्षाचा वारसा बहाल केला.  आई (विजया थोरात) या आपल्या माय माऊलीचा आज जन्मदिवस ! आई आपल्या मुलांचा उत्कर्ष व सुख पाहून जो आनंद जे समाधान व जीवनाचं सार्थक म्हणून अनुभवते तो परमोच्च असतो. आज पर्यंत ही अनुभूतू तुझ्या उदरी जन्म घेवून तुला देवू शकले की नाही माहीत नाही. परंतु आजच्या तुझ्या या जन्मदिनी हे सुख तु तुझ्या डोळ्यांनी पहात व हृदयाने अनुभवत राहशील हा विश्वास तुला देते. लेकरांच्या काळजीने तुझ्या हृदयाचे पिळवटून जाने मी समजू शकते. आई आहेस, किती ही झालं तरी काळजी सुटणार नाही याची खात्री आहे.  "तुझ्या काळजाच्या त्या काळजीतील वेदनेला मात्र विराम देईन तुझं निखळ हसणं आणि चेहऱ्यावर आनंद टिकून ठेवण्यासाठी गरज भासली तर नभाला ही झुकविणं  तु फक्त पाठीवर मायेचा हात फिरवत रहा आई,   या विश्वातील सर्वात मौल्यवान असा ऐवज तुझ्या मुलांचं सुख तुझ्या हृदयात साठविणं !" तु माझ्यावर करतेच त्याची तुलना होवू शकतं नाही, तरी तितकंच तुला प्रेम 😘🌹♥️🥰 जन्मदिनी उदंड व आरोग...