Posts

Showing posts from August, 2021

रक्षाबंधन

Image
माझे,माझ्या कुटुंबियांचे,समाजाचे, राष्ट्राचे,मानवतेचे या वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सर्व भगिनी व बांधव यांना रक्षाबंधनाच्या शिवमय शुभेच्छा ! रक्षाबंधन हा केवळ बहीण-भाऊ यांचे नातं दर्शवणारा सण का असावा? प्रत्येक नात्यातील निर्माण होणारा विश्वास दृढ करणारा हा सण का नसावा?  त्या अनुषंगाने आपण सर्वांनी हा सण साजरा का करू नये ?.. लिंग भेद,स्त्री पुरुष समानता-असमानता यासारखे विषय या व अशा असंख्य अनावश्यक रूढी,परंपरा व संस्कृतीच्या नावाखाली पिढ्यानंपिढ्या साजरे होणाऱ्या सणांना आपणच जाणते-अजाणतेपणे खतपाणी घालत  आहोत.बहिणीचं रक्षण करणारा भाऊ असतो..हे विचार आपण लहानपणापासुन मुलांवर बिंबवत रहातो. म्हणजेच,स्त्री/मुलगी ही स्वतःच रक्षण करण्यास असक्षम आहे हे शिकवायचं आणि तिने आयुष्यभर आवलंबून रहायचं..तसंच मुलाने आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली रहायचं,आपण पुरुष आहोत आणि स्त्रीचे  रक्षणकर्ता आपणच या भ्रमात आयुष्य जगायचं. खोट्या आणि चुकीच्या रूढींमुळे ना स्त्री मुक्त आयुष्य जगू शकते ना पुरुष ! स्त्री सतत परावलंबी व पुरुष सदैव वर्चस्ववादी,पण दोघे ही संस्कृतीच्या ओझ्याखाली दबलेले..मग नातं कोणत...

"क्रांतिसिंह"

Image
३ऑगस्ट..क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिसूर्याची जयंती !🚩👏🏻 लहानपणापासून त्यांच्या विषयी खूप ऐकलं आणि वाचल होत.त्यांचा तो रांगडेपणा,करारीपणाचा,आधी स्वातंत्र्यसाठी क्रांती आणि नंतर समाजसुधारक म्हणून स्वतःच उभ आयुष्य झोकून दिलेले, सत्यशोधक, प्रयत्नशील,परिवर्तनकारी,रूबाबदार,गांधीवादी व स्वतःचे विचार असलेले,उच्च विचारसरणी व साधी रहानी असे क्रांतिसिंह नाना पाटील. सतत नवचैतन्य व नवविचार निर्माण करणार व्यक्तिमत्व,तसेच मातीशी असणार नात घट्ट असलेले.  आज देश स्वातंत्र्य होवून ७० वर्ष पूर्ण झालेले असताना देखील आपण मानसिक गुलामगीरी व वैचारिक पारतंत्र्यातून अजून बाहेर पडू शकलो नाही याची खंत वाटते.आज देशाला नानांच्या पुरोगामी कृतिशील विचारसरणीची अवश्यकता आहे. नानांचे वारसदार सर्वपरीने नानांचे विचार समाजा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.पण,आपण सर्वांनी नानांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार,आचार हे सुधारित समाजाचे व खर्या अर्थाने स्वतंत्र भारत देशाची निर्मिती करण्यास आचरणांत आणणे गरजेचे आहे.प्रस्थापित विध्वंसक प्रवृत्तीला मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रत्येक घरात नानांचे विचार पोहोचणं ह...