१ मे महाराष्ट्र दिन
१ मे महाराष्ट्र दिन ! लेख गेल्या वर्षीचाच आहे.त्यात दोन चार वाक्य महाराष्ट्राची आजची स्थिती दर्शवणारे जोडले आहेत. परंतु आशयातील गाभा मात्र बदललेला नाही.आज ही महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.तो प्रयत्न रोखला पाहिजे.का? त्यासाठी हा लेख आवर्जून वाचा. १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. आजच्या दिवशी १९६० साली स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती.पण या मागचा इतिहास फार संघर्षाचा आहे.राज्य पुनर्रचना आयोगाने त्यावेळी (१९५६)महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले.महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक मराठी माणूस या निर्णयाने क्रोधित झाला होता.अनेक ठिकाणी,विविध पद्धतीने सरकार विरोधात निषेध व्यक्त केला जात होता.संगठीत कामगारांचा असाच एक भव्य मोर्चा २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन परिसरात जमला होता. सरकार विरुद्ध घोषणा व निषेध व्यक्त होत होते. पोलीसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव टाकला जात होता.आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. एवढं होऊन देखील कामगारांचा मोर्चा आपल्या भूमिकेवर अटळ होता.महाराष्ट्र द्वेषी तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई या...