Posts

Showing posts from March, 2021

तुकाराम बीज सत्य !

Image
आज तुकाराम बीज,म्हणजे तुकाराम महाराज यांचा स्मृतिदिन !  'आम्ही जातो आमुच्या गावा,आमचा रामराम घ्यावा'..हे असं काहीस म्हणत पुष्पक विमानात बसून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं भंपक ज्ञान आयुष्यभर माथी मिरवणाऱयांसाठी खास दोन शब्द.. बहिणाबाईंचा एक दोन ओळींचा अभंग आहे, तुम्हांसी वाळीस ब्राह्मणाचे पंक्तिं । तुम्ही गुरुभक्ती नका सांगूं ॥ बहिणी म्हणें ऐसें मंबाजी बोलिला । द्वेषही मांडिला तेच क्षणीं ॥ यात मंबाजी तुकाराम महाराज हे ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांना स्वतःच्या पंक्तीत बसत नसल्याचे सांगून गुरुभक्ती बाबत त्यांनी बोलू नये असं म्हंटल आहे.म्हणजे भेदाभेद, वर्चस्ववाद या जोरावर ज्ञान संपादन करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता हे समजतं.एवढंच नाही तर सत्य  प्रबोधनातून जनसामान्यांपर्यंत पोचवणे आणि त्यांना जागृत करणे हा अक्षम्य गुन्हा होता.तरी तुकाराम महाराज ठामपणे सत्यशोधक,विज्ञानवादी,बंडखोर, विद्रोही भूमिकेतून बहुजन जनतेसमोर सत्य मांडत राहिले.हे विचार मूळ धरत होते.जे या मंबाजीसारख्या ब्राह्मणवादी लोकांना न पचणार होत.   बहिणाबाई पुढे सांगतात,हे सर्व काही मंबाजीने  द्व...

जागतिक जल दिन

Image
२२ मार्च जागतिक जल दिन ! तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल असं म्हंटल जात.युद्ध होईल की नाही माहीत नाही,पण पाण्या वाचून आपली पृथ्वी नक्की निर्जीव होईल.आज २१ व्या शतकात मानव पाण्यासाठी संघर्ष करतोय.लाखो लोक प्रदूषित पाणी पीत आहेत.आपण वर्ण,जात,पंथ असे  भेद घोटभर पाण्यासाठी करत उच्चं असल्याचा पोकळ स्वाभिमान बाळगतो.पाणी हे जीवन आहे.पाण्याला नाही म्हणू नये.असे खुप काही आपल्याला शिकवलं जात.   प्रत्यक्षात मात्र त्याच्या उलट कर्म करतो.हे हट्ट सोडा. ती हिंदीतील कविता आहे बघा,  मछली जल की राणी हैं l जीवन उसका पानी हैं l हाथ लगाओ तो डर जायेगी l बहार निकालो तो मर जायेगी l पाणी हेच सर्वांचं जीवन आहे ! आपली गत ही त्या माशा सारखीच होईल.कारण आपण एक वेळ उपाशी राहू शकतो.पण,तहानलेले राहू शकतो का ?  विचार करा..वेळीच सावरणं गरजेचं आहे..धोक्याची घंटा वाजून खुप काळ लोटला आहे..आपण नक्की कशाची वाट बघतोय ? हिरवा निळा पृथ्वीचा रंग काळा होण्याची ? नाही ना.. एकदा सोबत दिलेली चित्र निरखून बघा. पाणी वाचवा,पृथ्वी वाचवा ! हा संकल्प आज जागतिक जल दिन निमित्ताने करूया. जागतिक शाश्वत विकास ...

चिऊ

Image
'चिऊ'  या चिऊ ताईच्या गोष्टी ऐकत लहानाचे आपण मोठे झालो.आई झाल्यावर माझ्या मुलांना ही मी गोष्टींमधून ह्या चिऊताईची ओळख करून दिली.आपण खुप साऱ्या चिमण्या पाहिल्या आणि त्यांचा भुर्रर्र..कन उडून जातानाचा आवाज अनुभवला आहे.  पण खंत ही वाटते की इतर काही अनुभवांप्रमाणे ह्या चिऊताईच्या सहवासाचा आनंद आपल्या मुलांना घेता आला नाही.कारण ? आपणच ! वाढत प्रदूषण आणि तंत्रज्ञान या जीवांसाठी घातक ठरतं आहेत.  कोविड सारख्या विषाणूने संपूर्ण जगाला एक संदेश दिला आहे.आपण खुप काही मिळवण्याच्या हव्यासापायी इतर जीवांच्या आयुष्याशी खेळत आहोत.आता जरा कुठं तरी थांबलं पाहिजे.जसं सक्तीनं का होईना ह्या वर्षभरात आपण नियम पाळले आणि काही अंशी चांगला बदल ही पर्यावरणाच्या बाबतीत दिसून आला.  तर आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने थोडा बदल स्वताहून स्वीकारुया,पर्यावरणाचे रक्षण करूया आणि आपल्या चिऊला तीच अस्तित्व भेट म्हणून देऊया.  प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

चवदार तळ्याचा सत्याग्रह

Image
२० मार्च  चवदार तळ्याचा सत्याग्रह दिवस ! पाणी हे जीवन आहे.ह्या पाण्यावर समस्त जीवितांचा अधिकार आहे. पण मानवी प्रवृत्ती किती खालच्या पातळीची असू शकते,हे जेव्हा समोरच्याची जात बघून घोटभर पाणी पिलं म्हणून मारहाण होते या वरून कळून येते.या वरून इथून मागे काय होत असेल याची कल्पना येते. मानव म्हणून जन्माला आलो की काही अधिकार त्या सोबतच जन्म घेतात.जगण्याचा अधिकार सगळ्यात महत्वाचा.त्यासाठी पाणी हे अत्यावश्यक.हो,पण काहींसाठी हा पाण्याचा संघर्ष फार मोठा होता.  चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक तलाव आहे.येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे.या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते.तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी इथं हा सत्याग्रह केला. हा लढा म्हणजे ‘समतेचे प्रतीक’ आहे. आजच्या दिवशी मानव म्हणून आपण सर्व समान आहोत व जीवनावश्यक गरजेच्या गोष्टींवर सर्वांचा समान अधिकार आहे ही या सत्याग्रहातून शिकवण अनेकांना मिळाली आणि पाण्यासाठीचा म...

छत्रपती शंभूराजे स्मृतिदिन

Image
११ मार्च  स्वराज्यरक्षक,बुधभूषणकार,स्वराज्याचे दुसरे छत्रपती,  छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन.. औरंगजेबाने शंभूराजे यांच्या समोर जिवाच्या बदल्यात स्वराज्याचा सौदा केला होता.पण स्वराज्याच्या मातीशी अन माणसांशी बेईमानी करेल तो शिवाचा छावा शंभू कसा.. स्वराज्याच्या रक्षणाखातर ज्यांनी आपले प्राण अर्पिले. आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले.  अशा माझ्या धाकल्या धन्याला आजच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम व शिवाभिवादन ! प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

ज्ञानाई सावित्रीमाई स्मृतिदिन

Image
ज्ञानाई सावित्रीमाई..  स्त्री शिक्षण,सत्यशोधक समाज,प्रबोधन व प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तन करून मानवहीत जोपासणाऱ्या सावित्रीमाई. आयुष्यभर इतरांसाठी संघर्ष केला,संपूर्ण आयुष्य तुम्हा आम्हासाठी झिजवले.प्लेगच्या रोगाने ग्रासलेल्यांची अहोरात्र सेवा केली.शेवट पर्यंत..हो शेवट पर्यंत सावित्रीमाईने आपले उभे आयुष्य जसे समाजहितासाठी अर्पण केले,तसेच मृत्यूला देखील त्यांनी सहज कवेत घेतले.प्लेगच्या रुग्नांची सेवा करताना सावित्रीमाईंचे  प्लेगने ३ मार्च १८९७ रोजी निधन झाले.धन्य ती माता ! सावित्रीमाई होत्या म्हणून आज मी व माझ्या असंख्य माता भगिनी आपल्या कार्याचा,कर्तृत्वाचा झेंडा अभिमानाने फडकवत आहेत.अशा माझ्या या मातेला स्मृतिदिना निमित्त विनम्र शिवाभिवादन ! प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

जागतिक महिला दिन

Image
लिहिलेली पोस्ट जूनी आहे,पण विचार महत्वाचे ! आज सकाळपासूनच मन उदास आणि अस्वस्थ होतं.महिलांचा जय जय कार होता आहे आज आणि दुसर्या बाजूला त्याच महिलांच्या होत असणाऱ्या अत्याचारातील वाढ चिंतेचा विषय !!  घरातली कामं उरकून बसले आणि क्षणात शून्यात विलीन झाले. ह्या शून्यातून बाहेर पडले ते फोनच्या आवाजाने..  फोन एका परिचित व्यक्तीचा होता. तिकडून आवाज आला,ताई महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !  मी आभार मानले आणि दुसऱ्या क्षणातच तिकडून प्रश्न आला.. दिनविशेष काही लिहिलं नाही ताई ?  थोडी कामात असल्याने जमलं नाही म्हटलं आणि संभाषण थोडक्यात उरकलं.ताई आज काही लिहिलं नाही..असे दोन मेसेज ही आले होते. मन व मेंदूवरील जळमाट काढून लिहायला बसले..विषय,अर्थातच महिला !  आज महिला दिन..तो ही जागतिक ! आपला माणूस म्हणून विचार केला जावा, पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला स्थान मिळावं यासाठी का होतो महिला दिन..सॉरी जागतिक महिला दिन साजरा ? आपण मानव आहोत हे वेगळे सिद्ध करण्याची काही आवश्यकता आहे का स्त्रियांना ? आणि का मी पुरुषांच्या बरोबरीने असावं ? पुरुषांपेक्षा सक्षम मी नाही का ? कळत नकळत अनेक प्रश...

प्रश्न हेच उत्तर

Image
प्रश्न हेच उत्तर  नेहमीप्रमाणे आई मनीला महामानवांबद्दल माहिती सांगत होती. बोलता बोलता आई सांगू लागली.. (आई आणि मनी यांचा संवाद)   आई-आपण चिकित्सक असावं  मनी-का ?   आई-कारण चिकित्सेने प्रश्न पडतात  मनी-कसले प्रश्न ? आई-कोणती ही अडचण समोर असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी जे आपल्याला उत्तर देतात ते प्रश्न  मनी-अन जर उत्तर मिळालच नाही तर ?   आई-मग तर बेस्ट.. मनी-कसं ?  आई-उत्तर प्रश्नाला प्रश्नच मिळालं तर ते बुद्धीच लक्षण मनी-त्यानी काय होईल ?  आई-परिवर्तन  मनी-कोणाचं ?  आई-ज्याला प्रश्न पडतात त्याचं,त्याच्या कुटुंबाचं आणि संपूर्ण समाजाचं  मनी-एवढे प्रश्न कोणाला बर पडले असतील ?  आई-अग बुद्धांपासून,तुकाराम महाराज,जिजाऊ,शिवराय,शंभू राजे, फुले,शाहू,आंबेडकर,अहिल्या अशा अनेक महामानवांना,समाजसुधारक,विचारवंत,वीर,वीरांगना यांना असे प्रश्न पडले  मनी-त्याने काय परिवर्तन झालं ?  आई-लोक शिकले-सवरले,भेदा-भेद कमी झाले अन मानवहिताची कार्य घडली  मनी-मला जमेल हे परिवर्तन करायला ?  आई-(आई कौतुकाने मनीकडे भरलेल...

माझी मीच - I & Me

Image
आजचा विषय मी,माझ्यासाठी एक भक्कम आधारस्तंभ हा असून मुळ लिहिलेला लेख इंग्रजीत आहे.पण इथं मराठी वाचक आहेत हे लक्षात घेवून इंग्रजीत काय लिहिलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं कोणीच नाही.आपण एकटेच आहोत. या व अशा भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात आयुष्यात कधी तरी घर करून बसतात.त्यामुळे नैराश्य येत. मार्ग सुचत नाही.पण आपला आपणच मार्ग व्हायचं असत.थोडं कठीण वाटेल.पण प्रयत्न केला की जमेल.                        माझी मीच  कधी कधी शब्दांना खुप अर्थ असतो,तर कधी काहीच नसतो.अशा वेळेस केवळ कृती बोलते. एक अशी वेळ जीवनात येते की कोण आपल्यावर  किती प्रेम करत हे शब्दात सांगण्याला कधी कधी अर्थ उरत नाही.कारण त्यात भावना दिसत नाही. ते प्रेम कृतीत दाखवणं जास्त योग्य असत. प्रेम नसेलच तर मात्र त्यातून मुक्त व्हावं.. व इतरांना ही खोट्या आशेतून मुक्त करावं... किती तरी भावना,विचार आपण मांडून(लिहून)ठेवतो. पण आपलं कोणी जवळ असेल आणि हे विचार जर त्याच्याबरोबर वाटून घेता आले तर ते कागदावर मांडावेच लागणार नाहीत.ती प्रेमाची व्यक्ती असेल तर इतर क...