महामानवांचे दैवीकरण
संपूर्ण लेख जाणीवपूर्वक बारकाईने वाचून मगच प्रतिक्रिया द्यावी.. याला बिनडोकपणा ऐसे नाव.. महामानवांची पूजा करायची, आरत्या गायच्या, मंदिरे बांधायची आणि आपल्या कर्तृत्वशाली इतिहासाची राख रांगोळी करायची... असले हे फुकटचे धंदे करणाऱ्यांना पोकळ बांबूने झोडपून काढलं पाहिजे. अरे आपला इतिहास काय.. आपण करतोय काय? हो, पण या बाजारबुणग्यांकडून अपेक्षा ती काय करावी..??!! खरतर आपल्या हर एक कर्तुत्ववान पूर्वजाचा इतिहास आपण आपल्या हीन बुद्धीने पुसला. यात आर्यांना दोष देत बसण्यात काय धन्यता मानवी, जेव्हा आपलीच गिधाडं आपलंच मांस जिवंतपणी ओरबाडतात ! जे आद्य पिता व माता शिव पार्वती यांच्या विषयी झालं, तेच आपण छत्रपतींच्या बाबतीत करत आहोत. आर्यांनी चुकीची वाट दाखवली खरी, परंतु ती वाट चिकित्सा न करता चालत रहायची, यात कसले शहाणपण आले? या विषयी मी नेहमी सांगत आले. आज पुन्हा ही मांडणी करत आहे. महापुरुषांचे 'दैवीकरण' : कर्तृत्व पुसण्याचे एक पद्धतशीर षडयंत्र – आज आपल्या समाजातील एक भीषण वास्तव म्हणजे महापुरुषांच्या विचारांपेक्षा त्यांच्य...