Posts

"शब्द काहूर"

Image
"शब्द काहूर" चांद गुलाबी, मंद हवा विरह मज, भासे नवा.. ओढ प्रेमाची अशी, व्याकुळता जीवाची जशी.. मनी सोबतीची आस, अखेर शांत शब्दांसांगे प्रवास.. विरहाच्या शाईने गुंफले शब्द प्रेमाचे, रचनेतून वाहिले काहूर मनाचे.. शोधिला मैफिलीत रे विसावा, एकटीच तरी ही, कसा तुझा हा दुरावा? ओढ न सुटे तुझ्या प्रेमाची, आठवण दाटूनी येता त्या क्षणांची.. भरुनी वाहे ओंझल मज करांची, कहानी अजब अशी या नयनांची... — प्राची 

आज होळी .. म्हणजेच शिमगा..

Image
आज होळी .. म्हणजेच शिमगा..   होळी हा सण कि उत्सव? त्या विषयी नेमकी अशी माहिती द्या असे अनेकांनी सूचित केले होते.  *डॉ. अशोक राणा लिखित "सणांची सत्यकथा"* या पुस्तकातील होळी विषयी थोडी माहिती इथे देतं आहे. हे पुस्तके सर्वांनी वाचावे असा आग्रह माझा आहे. इथे संपूर्ण लेख न देता त्यातील काही भाग देतं आहे याची नोंद घ्यावी. प्रत्येकाला आपली मुळे शोधता आली पाहिजेत. त्यासाठी शोध घेता यायला पाहिजे.    उत्सवांमधून समूहभावना व्यक्त होते. तसेच बदलत्या संदर्भाचे कोंदण उत्सवाच्या स्वरूपाला नवेपण आणते. म्हणून अनेक सण-उत्सव बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भातही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्या बदलत्या स्वरूपातही त्यामागील हेतू मात्र व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. होळी हा कोणत्यातरी प्रवृत्तीचा निषेध करणारा उत्सव तसेच सणही आहे. उत्सव सामूहिकपणे, तर सण हे व्यक्तिगत स्वरूपात कुटुंबात साजरे करायचे असतात. होळीच्या सणाला शिमगा म्हणूनही संबोधतात. शिमगा करणे म्हणजे निषेध करणे असा वाक् प्रयोग मराठीत आहे. शिमग्यालाच गोव्यामध्ये 'शिगमा' असेही म्हणतात.   होळीच्या सणामागी...

महिला दिन विशेष

Image
महिला दिन विशेष  आज सगळ्यांना सुट्टी होती. सकाळचा नास्ता घरातील सगळे एकत्र करणार, म्हणून 'ती' सकाळीच स्वयंपाक घरात शिरून कामाला लागली. प्रत्येकाची वेगळी फर्माईश होती. एकदाचे सगळे टेबलावर एकत्र जमले. तोच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. विषय वाढता वाढता इतका वाढला कि घरासाठी आपण किती करतो हे प्रत्येक जन मोठमोठ्या आवाजात सिद्ध करू लागला. 'ती' मात्र सर्व शांतपणे न्याहाळत प्रत्येकासाठी बनवलेला पदार्थ समोर वाढत होती. मिश्किल हसत आता बास, खाऊन घ्या म्हणतं तीन सगळे पदार्थ थोडे थोडे आपल्या ताटात वाढून घेतले.      काही समजलं का? आज जागतिक महिला दिन साजरा करतं आहोत ना !?      जगातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वश्रुत आहे. तिला आज ही मानव म्हणून आपलं स्थान मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंबहुना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतं आहे. तरी ही असंख्य 'ती' हा लढा घरापासून ते समाजामध्ये अनेक क्षेत्रात कार्य करतं असताना धीरानं लढत आहेत. त्यांचा हा लढा मानसिक खच्चीकरणाद्वारे अधिक होतो. विनाकारण स्पर्धा व द्वेष करणाऱ्या इतर महिला, ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे वासनां...

मंथन

Image
मंथन  कोणी ही कोणत्या ही स्त्री बाबत आक्षेपाहार्य विधान करण्यावर माझा नेहमीच विरोध असतो. याचा अर्थ कोणी टीकाच करू नये असं नाही. परंतु, आपल्या भाषेचा वापर आपले संस्कार दर्शवतं असतात हे तितकंच महत्वाचे. अनेकांना मी स्त्रीवादी वगेरे वाटते. अर्थात स्त्रीवादी असणं किंवा कोणी तसं आपल्याला म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाही. हो पण मी एकांगी स्त्रीवादी निश्चितच नाही ! ते baised म्हणतात ना, म्हणजे पक्षपाती वगेरे मी नाही. मी पूर्वग्रहदूषित तर अजिबात नाही. म्हणून जिथे जे व ज्याचे चूक त्याला विरोधच असतो. तसंच, स्त्रियांच्या बाबत ही काही सत्य आपण स्त्रियांनी स्वीकारायला पाहिजे. पुरुषीसत्ता आपण किती वाहून घ्यायची याची मर्यादा आपल्याला कधी समजलीच नाही. आपली प्रत्येक बाब या पुरुषांवर अवलंबून ठेवायची. का? असा प्रश्न कधी आपल्याला सतावत नाही का? जगात एकटं कोणी काहीच करतं नाही. माणूस म्हंटल की एकमेकांची मदत, आधार वगेरे असतोतच. किंबहुना ते असावंच. परंतु, त्यासाठी किती झुकतं माप घ्यावं, याला मर्यादा का नसावी? पण इथे पण  बघाना लिहिताना "माणूस" असं लिहिलं आहे मी. माणूस हा पुरुष लिंगीच शब्द आहे ना? मग इथ...

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

Image
कोरोना आणि लस - एक षडयंत्र  काही महिन्यांपूर्वी माझ्या परिचयातील एका डॉक्टरांनी (रिसर्च) माझ्यासोबत चर्चा करताना कोव्हीडला अनुसरून अनेक विषयांचा खुलासा केला होता.  त्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांविषयी सांगितलं होत. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंता त्यांनी व्यक्त केली होती. अनेक प्रकारचे आजार बळावतील, असं ही म्हणाले होते. त्यामधे कॅन्सर, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गुठुळ्या होणं या सारखे अनेक आजार अधिक तिव्र स्वरूपाचे असतील. कॅन्सरचे तर कोरोनासारखे variation's दिसतील ! म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे धोके वाढतील असं स्पष्ट केलं.    या मधे 12 वर्षावरील मुला मुलींना ही कोव्हीड लस टोचवण्याचा हलकटपणा केला गेला. यामुळे लहानमुलांना ही या संभव्य धोक्यांना सामोरं जावं लागेल. मुली महिला पिशवीच्या आजाराने (कॅन्सर) अधिक त्रस्त होतील. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे ही भवितव्य या मुळे धोक्यात आहे. यापेक्षा अधिक काय नुकसान कोरोनाच्या आड या हरामी लोकांनी करायचं राहिलं आहे सांगा?    1) घोड्यावाल्याला सरकार लस बनवायला देवूनच कशी शकते?  2) कोणती ही लस माण...

ज्योतिबा

Image
आज ११ एप्रिल,  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती/जन्मोत्सव 🙏🚩   ज्योतिबा आज तुम्ही समोर असता तर प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी  व्यक्त झाले असते. तरी, आपल्याला स्मरून व्यक्त होते.    दिवसागणिक ज्योतिबा तुमचे विचार व कार्य मेंदू आणिक मनात दृढ होत आहेत. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या पथावर घेवून येण्याचे अशक्य प्रयत्न आपण पूर्वत्वाला घेवून गेलात. आता त्यातून तुमचे पाईक म्हणून अनेकांनी आपले सवते सुभे मांडले आहेत. आम्ही कसे फुल्यांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असं असलं तरी तुमचे विचार मात्र त्यांच्या कृतीतून केव्हाच हद्दपार झाले आहेत.    ज्योतिबा तुम्ही आम्हा बहुजन वंचितांना बोटाला धरून शाळेत घेवून गेलात. अक्षर ओळख शिकता शिकता कधी मानव म्हणून आमची ओळख होवू लागली समजलंच नाही. थोडी बहुत समाजात आमची विचारणा होवू लागली. घराचा उंबरठा ओलांडून गगनभरारी घेवू लागलों. ज्योतिबा तुम्ही तुमच्या सावित्रीबरोबर कोट्यवधी सावित्रीच्या लेकींचे अस्तित्व निर्माण केले.  खोट्या व अनावश्यक रूढी परंपरेच्या भया...

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन

Image
ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने नवा इतिहास रचला. गुलामीत खितपत पडलेल्या, जीवनात शोषणचं वाट्याला आलेल्या बहुजनांना आपले स्वतःचे राज्य-रयतेचे राज्य, म्हणजेच स्वराज्य हे संघर्षातून निर्माण केले व बहाल केलं. असे स्वराज्य निर्माते, अद्वितीय व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज.    स्वराज्य मिळवण्यासाठी जो संघर्ष, जे बलिदान जिवंतपणी शिवरायांना द्यावे लागले, तेच स्वप्न त्यांच्या मृत्यूचे ही कारक बनले. आपल्या या राजाच्या कर्तृत्वशाली इतिहासात अनेक शूरवीर, वीरांगना, अठरापगड जाती, बारा बलुतेदार सर्व मावळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. म्हणूनच हा राजा रयतेचा राजा होता आणि राहिलं.    परंतु, खेदाची बाब की, राज्याच्या अस्तनींत स्वराज्यद्रोही, घातकी, फितूर, द्वेषी, कटकारस्थानी बांडगुळ भट आणि स्वकीय निखारे होते. त्यांनी अचूक वेळ साधली आणि घात केला. स्वराज्य पोरकं झालं.  आजचाच तो काळा दिवस. इतिहासाच्या पानातील हृदय पिळवटून टाकणारी, कधी ही कानी पडू नये अशी घटना.  ज्याच्या जीवनाची गाथा वाचून नियती ही ढाय मोकलून रडली असेल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला ...