Posts

Showing posts from January, 2021

बालपण !

Image
मला पुन्हा एकदा बालपण जगायचं आहे.. मोठं होवून चंद्रावर जायचं ! हे स्वप्न पुन्हा गिरवायचा आहे..  आई-वडिलांच्या राज्यातील बालपण मोठे झालो की राहून राहून आठवत.लहान असताना कधी एकदा मोठे होतोय असं वाटत असतं.पण खरंच मोठेपण अंगी चढल की ते बालपण सुखदायी असल्याचे जाणवू लागतं. आई-वडील राजाराणी आणि आपण त्यांचे राजकुमार राजकुमारी.त्यांच संपूर्ण विश्व आपल्या भोवती फिरत असत.ते लाड,हट्ट पुरवणं संपुच नये असं वाटतं. आई-बाबा आहेत तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही हा विश्वास किती मोठा असतो.तो शब्दात कधीच मांडता येत नाही.   आपलं बालपण तर्कवितर्क यांना भेदून एका वेगळ्याच विश्वात भ्रमण करत असतं.आपण चंद्राला मामा समजू लागतो.त्याच्याशी एक वेगळेच आपलेपणाचा घट्ट नातं निर्माण होतं.अंधार पडला की त्याची वाट बघू लागतो.तो दिसला की आनंद गगनात मावेनासा होतो.आपल्या ह्या गमतीशीर मामाला कधी भेटायचं हा प्रश्न एक कोडंच बनून राहतो.कधी रुसून फुगून बसतो,चंद्रावर जायचा हट्ट धरतो.मग आपली समजूत काढली जाते.पण हे चंद्रावर जायचे स्वप्न गिरवता गिरवता आपण कधी मोठे होतो कळतच नाही.आपण बालपणीच्या आठवणीत गेलो की अशा गमतीशीर गोष्...

टाच वर न करता आकाशाला स्पर्श व्हावा, इतकं सहज आयुष्य जगायचं आहे !

Image
टाच वर न करता आकाशाला स्पर्श व्हावा, इतकं सहज आयुष्य जगायचं आहे ! आपण जन्माला येतो तेव्हा ह्या विश्वाशी आपण पूर्णतः अज्ञात असतो.प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवली जाते.फक्त श्वास घ्यायचा सोडून. तो आपण आपलाच शिकायचा असतो.एकदा तो घेतला की आपण पहिली पायरी चढलो म्हणायचं. मग नवीन नवीन ज्ञान प्राप्त करता करता श्वास सहज होत जातो.किती सोपं वाटतं नाही आयुष्यात असं. अगदी टाच वर न करता आकाशाला स्पर्श व्हावं इतकं सोप्प..हो ही माझी कल्पना आहे,पण एकदा विचार करून बघा.क्षणात काही तरी गवसल्यासारखं वाटेल. अर्थात प्रत्येकाला इतकं सोप्प आयुष्य जगावं वाटतं. पण ते शक्य नसतं.पहिल्या श्वासापासून आपला जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होतो तो शेवटच्या क्षणापर्यंत.    कोणाचं ही आयुष्य दिसतं तितकं सहज व सोपं नसतं. जन्माला आल्यानंतर इथल्या पडद्यावर ज्याला त्याला त्याचा प्रयोग रंगवायचा असतो.त्यातून कोणाचीच सुटका नाही.पण हे संघर्षमय आयुष्यात तणावात जगायचं असा नियम नक्कीच नाही.आयुष्यातील हर एक क्षण तर्कशास्त्राप्रमाणे (लॉजिकप्रमाणे)जगण्यात मजा नसते. कधीतरी आपल्या विचारांना मुक्त विहार करू द्यायचा असतो.कधी बालपण तर कधी प...

मानवहिताय !

Image
ज्या देशात आज सुद्धा मंदिर उभारणीसाठी लोक वर्गणी गोळा करतात, तिथ परिवर्तनाची कास धरून महामानवांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारे वैचारिक वारस मानवहिताचे कार्य करत आहेत.. प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

आत्मबल

Image
प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाची काही स्वप्न असतात. ती अस्तित्वात उतरवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा गाठत असतात.अशाच संघर्ष व अपयश या कात्रीत अडकलेल्या अनेकांसाठी हेतुपर प्रेरणा. आयुष्यात खुप मोठी झेप घ्यायची आहे.  पंख भरारी घ्यायला सज्ज आहेत.  आता आकाशाला गवसणी घालणार, तेवढ्यात ते पंख छाटले जातात ! आपले पंख छाटल्या गेलेत हे काही क्षण कळत देखील नाही.आणि पुढच्या क्षणी ती झेप अयशस्वी होते. आपण दणकन खाली कोसळतो..आपली अवस्था बघून आपणच रडवेले होतो.हुंदके देत आलेल्या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न करतो.मन जरा शांत झालं की नेत्रांमधून वहाणाऱ्या आसवांच्या अंधुक नजरेतून आपलेच हात आपसूक आपलेच आश्रू पुसताना दिसतात.तेव्हा लक्षात येत,अरे माझ्याकडे पंजे आहेत की ! उडता आलं नाही म्हणून काय झालं.पळता तर येईल ! मी पुन्हा प्रयत्न करेल.. एक दिवस पुन्हा भरारी देखील घेईल..कारण माझा आत्मविश्वास प्रबळ आहे. (I Can and We Can)..मी किंवा आम्ही हे करू शकतो या शब्दातील जादू काही औरच आहे. अनुभवून बघा ! प्राची दुधाने वारसा सोशल फाऊंडेशन

वारसा सोशल फाऊंडेशन आयोजित व्हर्चुअल जिजाऊ जन्मोत्सव १२/०१/२०२१

Image
सर्वांना जय जिजाऊ  १२ जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब जन्मोत्सव निमित्त वारसा सोशल फाउंडेशन वतीने व्हर्चूअल जिजाऊ जन्मोत्सव आयोजित करण्यात आला होता.गुगल मीटच्या माध्यमातून साधारणपणे दीड तासाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कोविडच्या या काळात अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.पण १२ जानेवारी साजरी करत असताना असणारी काळजी व उत्साह दोन्ही लक्षात घेऊन वारसा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून मी हा व्हर्चुअल कार्यक्रम घेण्याचे ठरवले.प्रबोधन होण हा वारसाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.सत्य इतिहासाबरोबरच काळासोबत पुढे पाऊल  टाकणं तितकंच महत्त्वाचं असतं.म्हणून सत्य इतिहासाच्या प्रबोधना बरोबर तंत्रज्ञानाचे ज्ञान असणंही आवश्यक आहे.या कार्यक्रमातून दोन्ही बाबी साध्य होण्यास व एकमेकांशी संवाद व चर्चा करण्यास निश्चित सकारात्मक परिणाम झाल्याचे लक्षात आले.     कार्यक्रमाची सुरुवात जान्हवी दुधाने(माझ्या लेकीने)जिजाऊ वंदना घेऊन केली.प्रास्ताविक(मी) प्राची दुधाने यांनी केले.वारसा सोशल फाउंडेशनचा उद्देश,वर्चुअल कार्यक्रमाची संकल्पना या विषयी माहिती दिली.प...

जिजाऊ

Image
जय जिजाऊ 👏🚩   १२ जानेवारी  जिजाऊ जन्मोत्सव                ॥ जिजाऊ ॥ काय वर्णावी आई जिजाऊ तुझी महती, तव चरणी नतमस्तक सृष्टी सारी । खरा धर्म तूच दाविला, स्वराज्याचे रक्षक आम्ही,तरी तो आम्हा तारी ॥  तूच आमचा अभिमान,तूच तो स्वाभिमान, ऊरात भरून आमच्या घेते उंच भरारी । काय माघू नी काय देवू मी तुजला, अवघा नभ कवश्ल्ये उतरविला तू मज दारी ॥ धन्य मी जाहले पावन भूमी मज लाभली, तुझेच रूप आई चरा चरी । संस्कार व शौर्य तव शिव-शंभूस लाभले, दे आशीष कीर्तीवंत घडो मज उदरी ॥ जिजाऊ चरणी अर्पण 🚩👏 प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

जीणं

Image
आपल्या जीणं इतकं स्वस्त झालं आहे का ?  आपलं जीणं इतकं स्वस्त झालं आहे का ?  बुद्धी,भावना बोथट झाल्या आहेत..  मानवता मृत्यूशय्येवर असल्यासारखी भासत आहे !    मानवाला एखाद्याचा जीव गेलेला पहाणं तसं फार वेदनादायक असत.त्यात ती व्यक्ती जवळची असेल तर दुःखाचा डोंगरच कोसळतो.पण गेल्या काही वर्षात कोणाचा जीव जाणं म्हणजे फार भावनात्मक राहिला नाही.सतत मरण कानावर पडून पडून जणु काही आपली बुद्धी व भावना बोथट झाल्या आहेत.मृत्यूचा आकडा तेवढा फक्त घोळत रहातो.तात्पुरती हळहळ व्यक्त होते.पुन्हा जैसे थे !ज्यांनी आपलं कोणी गमावला आहे ते या दुःखातून सावरतील की नाही माहीत नाही.पण आपण तिरहित व्यक्ती म्हणून दोन मिनिट सांत्वन करून ते विसरून जातो.पुन्हा एखाद्याच सांत्वन करण्यासाठी सज्ज असतो.   अनेक मृत्यू एखाद्याच्या स्वार्थापायी,हलगर्जीपणामुळे, आकसापोटी झालेले असतात.त्यांच्या आप्तेष्टांचा आक्रोश सहनशीलते पलीकडे असतो.पण कालांतराने तो ही आपल्याला ऐकू येत नाही.खरंच आपण इतके निष्ठुर  झालो आहोत का ? अशा घटना खूप सहज झाल्या  आहेत.पण म्हणून काय मानवाच्या जीवनाचे मोल कमी झालं का ? त्...

एकीचे बळ सर्वश्रेष्ठ !

Image
एक दिवस चढाओढ लागली,  चंद्र,सूर्य,तारे अन नभाची. कोण श्रेष्ठ ? तु की मी ?  बाचाबाची या सर्व भावंडांची ! सूर्य म्हणे तेजस्वी मी,  उजळून देतो दाही दिशा.  माझ्या शिवाय आहेच कोण,   उलगडण्या उषा अन निशा ?  चंद्रही पुढे सरसावला.. म्हणे शितल माझी काया,  यापुढे न चाले तुझी माया. तप्त किरणे करी लाह्या लाह्या,  त्याला औषध माझी मंद छाया. तारे हसले..म्हणे तुमचे कार्य कसले ?  आम्ही लाखो-कोटी,  तुमची शोभा खोटी. मधेच नभ गरजले,  तुम्ही सारे उगाच सजले. तुम्हा सर्वांना माझ्यामुळे स्थान,   वाटेल तेव्हा घालतो सर्वांना स्नान. आड माझ्या लपती सारे,  काय सूर्य,चंद्र आणिक तारे.. दुरून हे सारं पाहून निसर्ग हसला,  कसली बात तुम्ही घेऊन बसला ?  हळू हळू तो सांगू लागला,  नसे कोणी श्रेष्ठ,  असेल जरी जेष्ठ. एकीचे बळ हेच सर्व श्रेष्ठ...! प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन Picture credit_मीच.. तो चंद्र भासला,तरी सूर्य आहे..

पाऊस

Image
पाऊस  तपत्या धरणीवर पडतो पावसाचा थेंब जेव्हा,  आठवणींच्या गंधाला येते उधाण तेव्हा. भरदिवसा काळोख भासू लागतो, तेव्हा संध्याकाळचा दिवा दिवसा तेवू पहातो. सैरभैर पाखरं नभात फिरू लागतात, अचानकपणे गाठलेल्या संकटाला तोंड देतात. कुठं वाहिलं घर त्या काऊच, तर कुठं काळीज फाटले चिऊचं. बरसला बिन वेळेचा हातभर,  पाणी वावरात बळीच्या वीतभर. सारी सारी दुनिया आडोसा शोधतीया, बरसनाऱ्या मेघाला आवरा म्हणतीया. कधी हवासा कधी नकोसा, हा बरसतो कधी पण कसा ? पडला तरी ताप, नाय पडला तरी दुःख अमाप. निसर्गाच्या पुढे मानव झाला गप, आले अन गेले कैक तप. आजही तो असाच बरसला, येता जाता सारा गोंधळ माजवून गेला. किलबिल पाखरांची,  तर कुठं लगबग माणसांची. एवढ्यात,कोण म्हणतो आपल्याला काय, घोटभर चहा अन भजी करते काय..!!??  प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

नामधारी नाही..ती कामधारी !

Image
नामधारी नाही..ती कामधारी ! तिला नुसतं नामधारी होणं कधी जमलंच नाही.. काही तरी धेय्य आयुष्यात निश्चित असावं.त्यासाठी येईल त्या परिस्थितीला सामोरं जावं लागण,संघर्ष करणं हेच जिवंतपणाच लक्षण आहे असं तिला वाटायचे.नुसतं नामधारी असणं किती सोपं असत.पण हे सोपंच कधी तिला जमलंच नाही. आधी तिला हे सारं कळलंच नाही.खुप विरोध पचवावा लागला.आज ही ती तो विरोध स्लो पॉयझन सारखा पचवत आहे..परक्यांबरोबर आपल्यांचा ही ! हा विरोध आपल्या कर्त्यापणामुळे होतोय,हे जाणून तर तिच्या मेंदूला मुंग्या आल्या.नामधारी न होता वास्तविक कामधारी असणंच तिला त्रासदायक होत गेलं. पुरुषी,बुरसट मानसिकता कुठं आणि किती आपला श्वास,आवाज,जिणं  दाबत आहे हे हळू हळू तिला समजतंय.जीव आकांताने त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी झटतोय.हो ! पण हे सगळं शांततेत चाललंय.तिच्या चेहऱ्यावर हस्य अबाधित आहे. ती सगळी कर्तव्य पार पाडत आहे.मन मात्र सैरभैर होत आहे.चाललेल्या मार्गावर आपलं धेय्य गाठु पर्यंत,वाट किती ही खडतर झाली तरी त्यावर चालत रहाणं.हेच मुळात पहिलं धेय्य तिने बाळगल आहे. सापाने कात टाकावी तशी ती ही कात टाकत असते. नैराश्याची,दुःखाची,विझत चाललेल्या स...

थकवा

Image
थकवा  तन अन मनाच्या अतिरिक्त ओझाने जीव हा शीणला, बघता बघता जीवाला थकवा किती जाहला. घंटा दोन विसावा घेतला,  तरी जीवाला तवाका न आला. थकव्याला ही असे पत मोठी, जीवन प्रवासाची सांगतो कथा छोटी. शौर्य अन धैर्य जयाच्या अंगी, थकवा जाणवे तयाच्या ही पंखी. समजून घेता जनाला, येई थकवा मनाला. नका करू व्यर्थ ऊर्जा खर्च, कोणासाठी होता..जाणा तुम्ही मूर्ख. थकव्या मनाला जमे समेट करणे, आव्हान तुझ्या मनाला.. शांततेत समेटीतील जखम भरणे. झटकून शीण मनाचा, गंज मालव थकव्याचा. हाच एक मार्ग सुटकेचा, थकव्याच्या मृगजळातून शांतपणे निसटण्याचा.. प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

ज्ञानाई सावित्रीमाई फुले..

Image
३ जानेवारी ज्ञानाई सावित्रीमाई फुले यांचा जन्मोत्सव ! ह्या मातेच्या कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.. ३  जानेवारी १८३१ साली सातारा येथील नायगावात सावित्रीबाईंचा जन्म झाला.त्यांच्या वडीलांचे नाव खंडोजी नेवसे व आईचे लक्ष्मीबाई होते.वयाच्या ९ व्या वर्षी सावित्रीबाईं यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याबरोबर झाला.शिक्षणाची आवड व समाजसुधारक विचार असलेले ज्योतिबा फुले यांनी समाजातील अनावश्यक रुढी परंपरांना फाटा देवून सावित्रीबाईंना लग्नानंतर शिक्षण दिले व त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापक बनल्या. १ जानेवारी १८४८ ला पुण्यातील भिडेवाड्यामधे पहिली मुलींची शाळा सुरू केली.एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा होती.शाळा सुरू करतावेळी केवळ ६ मुली होत्या,ती संख्या वर्षांखेर ४०-४५ पर्यंत पोहोचली होती. ह्या घटनेचा धस्का जणू सनातनी लोकांनी घेतला व सावित्रीबाईंचा छळ सुरू केला.येताजाता अंगावर शेण व गोटे यांचा मारा करू लागले.एवढ्यावरच हे उन्मत्त थांबले नाहीत,तर खालच्या पातळीचे भाष्य ही करू लागले.ह्या सगळ्या प्रसंगांना न घाबरता व न डगमगाता सावित्रीबाईची शिक्षणप्रसाराची ज्यो...