२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...
कोरोना आणि लस - एक षडयंत्र काही महिन्यांपूर्वी माझ्या परिचयातील एका डॉक्टरांनी (रिसर्च) माझ्यासोबत चर्चा करताना कोव्हीडला अनुसरून अनेक विषयांचा खुलासा केला होता. त्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांविषयी सांगितलं होत. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंता त्यांनी व्यक्त केली होती. अनेक प्रकारचे आजार बळावतील, असं ही म्हणाले होते. त्यामधे कॅन्सर, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गुठुळ्या होणं या सारखे अनेक आजार अधिक तिव्र स्वरूपाचे असतील. कॅन्सरचे तर कोरोनासारखे variation's दिसतील ! म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे धोके वाढतील असं स्पष्ट केलं. या मधे 12 वर्षावरील मुला मुलींना ही कोव्हीड लस टोचवण्याचा हलकटपणा केला गेला. यामुळे लहानमुलांना ही या संभव्य धोक्यांना सामोरं जावं लागेल. मुली महिला पिशवीच्या आजाराने (कॅन्सर) अधिक त्रस्त होतील. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे ही भवितव्य या मुळे धोक्यात आहे. यापेक्षा अधिक काय नुकसान कोरोनाच्या आड या हरामी लोकांनी करायचं राहिलं आहे सांगा? 1) घोड्यावाल्याला सरकार लस बनवायला देवूनच कशी शकते? 2) कोणती ही लस माण...
आज ३० जानेवारी २०२२. मोहनदास करमचंद गांधी,म्हणजे भारताचे बापू, महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन.असंख्य प्रकारे आज त्यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी व मलीन करण्यासाठी प्रयत्न केले जातील,यात दुमत नाही. "माणूस मेला,की वैर संपत",म्हणणारे आज स्वतःचं गांधी हत्येच समर्थन करताना दिसतील व आपल्या विचारात गांधींना नथू बनून पुन्हा गोळ्या घालून कुटील हस्य चेहऱ्यावर दाखवतील.७० वर्षात इतकं धाडस निर्माण झालय,ते काय थोडय.. असो ! मी मात्र माझ्या कुवतीप्रमाणे (अर्थात् वैचारिक कुवत)इथ हा लेख प्रस्तुत करत आहे.याचं शीर्षक थोड हटके आहे.पण,संपूर्ण लेख आवर्जून वाचा हि विनंती आहे.उगाच अर्धवट तर्क वितर्क नकोत.मगच त्यातील विचार स्पष्ट होतील.तर चला सुरुवात करूया.. "बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"?? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ भारताला स्वातंत्र्य मिळून त्याची पंच्चहत्तरावी आपण २०२१-२२ मधे धूम धडाक्यात जगभर साजरी करत आहोत.देशाच्या स्वतंत्र्यं लढ्यात असंख्य भारतीयांनी आपल्या प्राणांची आहूती दिली,अनेकांनी शेवटच्या श्वासा पर्यंत स्वतंत्र्याचा नारा दिला,आपलं संपूर्ण जीवन भारतीयांनी येण...
Comments
Post a Comment