महिला दिन विशेष आज सगळ्यांना सुट्टी होती. सकाळचा नास्ता घरातील सगळे एकत्र करणार, म्हणून 'ती' सकाळीच स्वयंपाक घरात शिरून कामाला लागली. प्रत्येकाची वेगळी फर्माईश होती. एकदाचे सगळे टेबलावर एकत्र जमले. तोच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. विषय वाढता वाढता इतका वाढला कि घरासाठी आपण किती करतो हे प्रत्येक जन मोठमोठ्या आवाजात सिद्ध करू लागला. 'ती' मात्र सर्व शांतपणे न्याहाळत प्रत्येकासाठी बनवलेला पदार्थ समोर वाढत होती. मिश्किल हसत आता बास, खाऊन घ्या म्हणतं तीन सगळे पदार्थ थोडे थोडे आपल्या ताटात वाढून घेतले. काही समजलं का? आज जागतिक महिला दिन साजरा करतं आहोत ना !? जगातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वश्रुत आहे. तिला आज ही मानव म्हणून आपलं स्थान मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंबहुना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतं आहे. तरी ही असंख्य 'ती' हा लढा घरापासून ते समाजामध्ये अनेक क्षेत्रात कार्य करतं असताना धीरानं लढत आहेत. त्यांचा हा लढा मानसिक खच्चीकरणाद्वारे अधिक होतो. विनाकारण स्पर्धा व द्वेष करणाऱ्या इतर महिला, ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे वासनां...
प्रश्न हेच उत्तर नेहमीप्रमाणे आई मनीला महामानवांबद्दल माहिती सांगत होती. बोलता बोलता आई सांगू लागली.. (आई आणि मनी यांचा संवाद) आई-आपण चिकित्सक असावं मनी-का ? आई-कारण चिकित्सेने प्रश्न पडतात मनी-कसले प्रश्न ? आई-कोणती ही अडचण समोर असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी जे आपल्याला उत्तर देतात ते प्रश्न मनी-अन जर उत्तर मिळालच नाही तर ? आई-मग तर बेस्ट.. मनी-कसं ? आई-उत्तर प्रश्नाला प्रश्नच मिळालं तर ते बुद्धीच लक्षण मनी-त्यानी काय होईल ? आई-परिवर्तन मनी-कोणाचं ? आई-ज्याला प्रश्न पडतात त्याचं,त्याच्या कुटुंबाचं आणि संपूर्ण समाजाचं मनी-एवढे प्रश्न कोणाला बर पडले असतील ? आई-अग बुद्धांपासून,तुकाराम महाराज,जिजाऊ,शिवराय,शंभू राजे, फुले,शाहू,आंबेडकर,अहिल्या अशा अनेक महामानवांना,समाजसुधारक,विचारवंत,वीर,वीरांगना यांना असे प्रश्न पडले मनी-त्याने काय परिवर्तन झालं ? आई-लोक शिकले-सवरले,भेदा-भेद कमी झाले अन मानवहिताची कार्य घडली मनी-मला जमेल हे परिवर्तन करायला ? आई-(आई कौतुकाने मनीकडे भरलेल...
भाऊ बीज बहीण आणि भाऊ या नात्यांना एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर कोणा मिथकाची आवश्यकता नाही.बहीण भावाचं नातं म्हणजे एका बीजातून अंकुरलेला अन मायेची सावली निर्माण करणारा विश्वासाचा वटवृक्ष.आपण मोठे झालो की लहानपण पुन्हा यावं ही आस आयुष्यात एकदा तरी मनाला शिवून जाते.बालपण मजेचं म्हणून ही आठवण असते असं नाही.नात्यांमध्ये स्पष्टपणा,प्रेम,मायेचा ओलावा, निस्वार्थपणा,अल्लडपणा,पारदर्शकता,रुसवे फुगवे, विसरभोळेपणा,आनंद, सुख,आपलेपणा.सगळं कस निर्मळ असत.पण मोठेपण या सगळ्याचा घात करत. मग असं वाटत मोठ झालोच कशाला.पण शेवटी निसर्ग नियम आहे.पण मोठं होताना प्रेम ही मोठं व्हावं याच गाणं लहानपणी शिकलोच नाही.पावसाला मोठं होण्यासाठी पैसा दिला की तो मोठा होतो हे शिकलो,ते धादांत खोटं असलं तरी.पण नात्यांना प्रेम,विश्वास, आपलेपणा देवून मोठं करता येत हे खरं मात्र शिकायला विसरलो. बहीण भावाचं नातं नितळ वहाणाऱ्या झऱ्यासारख असावं.त्यात स्वार्थाचा लवलेश नसावा.बहीणभावाचं हे नातं रक्ताचं असावं असं नाही,पण ते निस्वार्थी असावं. मोठा भाऊ हा पिता समान तर मोठी ताई ही आई समान असते असं म्हणतात.टा...
Comments
Post a Comment