Posts

Showing posts from March, 2022

जन्मदिवस वृत्तांत

Image
Late Post ! जन्मदिवस वृत्तांत  २३ मार्च,माझ्या जन्मदिना निमित्ताने काही तरी वेगळा सामाजिक कार्यक्रम आपण घ्यावा हा विचार सतत मनात येत होता.२ वर्ष कोव्हीडच्या काळात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेवून पार पाडले. पण ते व्हर्चुअल माध्यमातून.प्रत्यक्ष लोकांचा सहभाग असणारा मात्र कोणताच कार्यक्रम घेता आला नाही. त्यामुळे हा कार्यक्रम कायम स्मरणात राहिलं व त्यातून समाज जागृतीच्या एका नवीन उपक्रमाचा उगम होईल हा हेतू समोर ठेवून कोणता कार्यक्रम घ्यायचा ते ठरवू लागले.१०-११ तारखेला कार्यक्रम घ्यायचा हे निश्चित झालं.पण कार्यक्रम घ्यायचा कोणता? हा प्रश्न काही सुटला नव्हता.१६ तारखेला लोकायतच्या अलका जोशी यांना संपर्क केला.त्यांनी नुकताच महिलादिनानिमित्त महिलांच्या विविध विषयी पुण्यातच शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजन केले होते. अलकाला मी माझी कल्पना सांगितली.जन्मदिनी शॉर्ट फिल्म तुमच्या माध्यमातून आपण अरेंज करू शकतो का अस विचारलं. ती लगेच हो म्हणाली.कोणत्या शॉर्ट फिल्म दाखवायच्या ही चर्चा श्रद्धा बरोबर सुरु होती.२३ मार्च हा शहीद दिवस असतो.वीर भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी उभारल...

प्रिय लेक जानू (जान्हवी)

Image
प्रिय लेक जानू,     आज तुझा जन्मदिवस.तुला खुप खुप प्रेम आणि आशीर्वाद.गेल्या वर्षीप्रमाणे तुला आजच्या दिवसाच्या निमित्तने हे पत्र लिहिण्याचे ठरवले.अशी पत्र आपण एकमेकांना लिहीत रहायला हवी.वर्तमानातच नाही तर भविष्यात यातील संभाषण आपल्याला प्रेरणा व ऊर्जा देत राहिलं.नवीन नवीन संकल्प हाती घेताना हे मार्गदर्शक ठरतील.हे आजच पत्र तुझ्यामध्ये होणारे बदल व त्याला सामोरं जाताना तू घ्यायची काळजी हे सांगणारे असले तरी यात प्रेमाचा व अतूट विश्वासाचा सुगंध भरपूर आहे हे लक्षात असुदे.    जानू तू प्रत्येक जन्मदिनी मागील वर्षांपेक्षा अधिक प्रगल्भ होताना दिसतेस.स्वतःसाठीचे छोटे छोटे निर्णय तू घेण्याचा प्रयत्न करत आहेस.शिक्षणाप्रती तुझं समर्पण बघून किती आनंद होतो हे शब्दात व्यक्त करता येणार नाही.शिक्षण तुझ्यातील वैचारिक कृतिशीलतेला यशाच्या उच्चं शिखरावर घेवून जाण्याचा उत्तम मार्ग आहे.हे तू अचूक हेरलस.तू मांडत असलेल्या विचारातून तुझ्या भविष्यातील कृतींचा आराखडा तू मांडत आहेस हे देखील समजतं.तू काही धेय्य निश्चित केली आहेस.तिथे पोचण्यासाठी तुला खुप कष्ट घ्यावे लागतील.संघर्ष ही सर करावा लागेल...

शंभु स्मृति

Image
११ मार्च  स्वराज्यरक्षक,बुधभूषणकार,स्वराज्याचे दुसरे छत्रपती,  छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन.. औरंगजेबाने शंभूराजे यांच्या समोर जिवाच्या बदल्यात स्वराज्याचा सौदा केला होता.पण स्वराज्याच्या मातीशी अन माणसांशी बेईमानी करेल तो शिवाचा छावा शंभू कसा.. तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.आपले लोकशाही,स्वातंत्र्य,अधिकार,हक्क, समानता अशी बहुमूल्ये असलेले स्वराज्य अबाधित रहावं म्हणून शंभू राजे वेदनेच्या असहाय्य आघाताचे घाव सोसत राहिले.आपल्या येणाऱ्या पिढ्या या गुलामगिरी,विषमता,हुकूमशाही,अन्याया सारख्या घातक  अमान्य मूल्यंविरुद्ध लढा सतत तेवत ठेवतील अशी आशा व इच्छा मनी या आपल्या राजानं अखेरच्या श्वासापर्यंत बाळगली असेल !   ज्या स्वराज्याच्या रक्षणाखातर त्यांनी आपले प्राण अर्पिले.आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले. ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? केवळ छत्रपतींच नाव घेवून ते मुगलांविरुद्ध होते भासवून धार्मिक तेढ निर्माण करायचा,दुसरीकडे त्यांची सतत बदनामी करायची आणि हिंदुत्वाच्या नावावर आपलं बस्तान मांडायचं.तुम्ही या अशा नीच मनुवृत्तीच्या मूठभर लोक...

ज्ञानाई सावित्री माई आणि आजच्या तिच्या लेकीं

Image
ज्ञानाई सावित्री माई आणि आजच्या तिच्या लेकी आज १० मार्च,ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांचा स्मृति दिन.स्वतः शिक्षित होऊन,स्त्रीयांना शिक्षणाच्या वाटा खुल्या करून देण्यापासून ते समाजहिताचे कोणते ही कार्य असो स्वतःला त्यात झोकून देवून आपल्या या मातेने मानवतेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला व तो आपल्याला बहाल केला आहे. आपल्या या सावित्री माईने तुम्हा आम्हा कोणालाचं अज्ञानाची झळ पोचू नये,यासाठी आयुष्यभर प्रखर अशा संघर्षाच्या अग्नीवर ती स्वतः अनवाणी चालली.ज्या स्त्रीया पायपुसण म्हणून झीजत होत्या, त्यांना शिक्षणाचे धारदार शस्त्र  सावित्रीमाईने हाती देऊन तीचा उद्धार केला.स्त्रीने शिक्षण घेतलं म्हणजे धर्म बुडतो.स्त्री शिकली की विधवा होते. अशा एक ना अनेक खुळचट समजुती या समाजात रूढ होत्या.या सनातनी विचारांविरोधात लढली ती आपली माय सावित्री.भारतातील पहिली महिला शिक्षिक होण्याचा बहुमान आपल्या सावित्री माईंना मिळाला.हे सगळं सहन न झाल्याने सनातन्यांकडून अंगावर दगड-गोटे शेण,शिव्या शापाचा मारा सावित्री बाईंवर झाला.सावित्री बाई या सगळ्याला धाडसाने सामोर गेल्या. यातून एका नव्या क्रांतीचा जन्म झाला. ...

आद्य माता पिता शिव पार्वती

Image
आद्य माता-पिता शिव पार्वती(महाशिवरात्री निमित्त) सिंधू संस्कृतीचे आद्य पुरुष(पिता) शिव आणि आद्य स्त्री(माता)पार्वती हे बहुजनांचे आदर स्थान.शिव पार्वती हे भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अतिशय गुणसंपन्न असे दांपत्य होते.ते तुमच्या माझासारखेच हाडामासाचे मानव होते.यज्ञ संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती पूर्वी हे दांपत्या आपल्या मुळ भारतीयांचे लोकप्रिय पूर्वज होते.सिंधू संस्कृतीचे जे अवशेष सापडले आहेत त्यात याचे पुरावे आहेत.कालांतराने वैदिकांनी नेहमीप्रमाणे शिव पार्वती यांची लोकप्रियता लक्षात घेता आपल्या या आद्य गण माता-पित्याचे स्वरूप बदलून त्यांना आपलेसे करून त्यांचे दैवीकरण केले.                                              पराक्रमी,कर्तृत्वान,कुशल,निष्कपट,संविभागी,दयाशील, भावनिक,तत्पर,लोककल्याणकारी,संरक्षक,बलशाली  अशा असंख्य गुणांनी युक्त शिव पार्वती होते. कृषक व त्याचं बरोबर पशुपालक संस्कृतीशी असलेला निकटचा संबंध त्यांना आपल्या पूर्वज स्वरूपात दर्शवतात.त्यांच्या संदर्...