Posts

भारतीय संविधान दिन

Image
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ! भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती. ६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन  करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते. नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे.     संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती ...

दोन शब्द आईसाठी 🤱💞

Image
दोन शब्द आईसाठी 🤱💞 माझ्यासारख्या निराकाराला आकार दिला.  परिव्यापक होण्याचे सामर्थ्य अंगी पेरले. आपला भरभक्क्म संघर्षाचा वारसा बहाल केला.  आई (विजया थोरात) या आपल्या माय माऊलीचा आज जन्मदिवस ! आई आपल्या मुलांचा उत्कर्ष व सुख पाहून जो आनंद जे समाधान व जीवनाचं सार्थक म्हणून अनुभवते तो परमोच्च असतो. आज पर्यंत ही अनुभूतू तुझ्या उदरी जन्म घेवून तुला देवू शकले की नाही माहीत नाही. परंतु आजच्या तुझ्या या जन्मदिनी हे सुख तु तुझ्या डोळ्यांनी पहात व हृदयाने अनुभवत राहशील हा विश्वास तुला देते. लेकरांच्या काळजीने तुझ्या हृदयाचे पिळवटून जाने मी समजू शकते. आई आहेस, किती ही झालं तरी काळजी सुटणार नाही याची खात्री आहे.  "तुझ्या काळजाच्या त्या काळजीतील वेदनेला मात्र विराम देईन तुझं निखळ हसणं आणि चेहऱ्यावर आनंद टिकून ठेवण्यासाठी गरज भासली तर नभाला ही झुकविणं  तु फक्त पाठीवर मायेचा हात फिरवत रहा आई,   या विश्वातील सर्वात मौल्यवान असा ऐवज तुझ्या मुलांचं सुख तुझ्या हृदयात साठविणं !" तु माझ्यावर करतेच त्याची तुलना होवू शकतं नाही, तरी तितकंच तुला प्रेम 😘🌹♥️🥰 जन्मदिनी उदंड व आरोग...

गणेशोत्सव

Image
गणेशोत्सव  भारताच्या प्राचीन सिंधू संस्कृतीचे आध्य दांपत्या शिव-पार्वती. शिव-पार्वती यांच्या गणांचा अधिपती गणपती.. बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ ! सिंधूजणांचे राज्य,म्हणजेच रयतेचे,गणांचे राज्य-गणराज्य !  भारताचे हे गणराज्य अखंड राहो,यासाठी मुळ स्वरूपातील गणपती स्वीकारून त्याप्रमाणे बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठ होवून, मानवहित जोपासण्यास जागृत होण्यासाठी आपणा सर्वांना गणेश/गणपती उत्सवानिमित्त सदिच्छा !  सोबत छायाचित्र दिल आहे ते, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती आहे. ही मूर्ती असलेले मंदिर,तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ आहे. असे अनेक गण आपल्याला नेमून दिलेल्या घटकांचे नेतृत्व करीत. जसे सेनापती, राष्ट्रपती, सभापती तसेच गणपती..  - प्राची दुधाने  वारसा सोशल फाऊंडेशन

"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य"

Image
"माझा मताधिकार, माझे स्वातंत्र्य" सध्या पहावं तिकडे  "आम्ही मतदान करणारं नाही" या भूमिका घेतल्या जात आहेत.  नेत्यांवर, राज्यकर्त्यांवर, राजकारणावर त्यांच्या नीतीवर, व्यवस्थेवर रोष दाखवणं ठीक आहे. पण मतदान करणारं नाही हे म्हणणं कितपत योग्य आहे? आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय म्हणून मतदानाचा अधिकार सर्व भारतीयांना मिळाला. खरतर मतदान नसून तो आपला अधिकार आहे. या देशाचे राज्य, इथली घटना सर्व काही to the people, for the people, by the people आहे. म्हणजेच, इथल्या लोकांनी, लोकांसाठी बहाल केलेलं आपले राज्य व घटना आहे. हे स्वराज्य आहे. स्वातंत्र्य मिळून अधिकार प्राप्त होणं ही साधी सुधी बाब नाही. आपल्या लाखो पूर्वजांच्या रक्ताचे पाट या मातीत वाहिले आहेत. जे स्वातंत्र्य अधिकाराने आपण उपभोगत आहोत ते त्यांच्या संघर्ष व बलिदानाचे द्योतक आहे. आपल्या स्वातंत्र्याला पारतंत्र्यत जाण्यावाचून न रोखू शकणारे आपण, कोणत्या अधिकाराने त्यांनी बहाल केलेला वारसा नाकारत आहोत? त्यांना आपल्या मताप्रमाणे वागता येवू न येवू. पण आपल्या लेकरा बाळांना कोणाची गुलामी नको म्हणून स्वतःच्या चामडीच्या पा...

स्वातंत्र्य

Image
स्वातंत्र्य  भारताला व इथल्या प्रत्येक सजीवाला परकीयांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष सर करून आपल्या पूर्वजांनी आपले रुधिर या मातीत वाहिले. त्यांच्या प्रत्येक बलिदानाची  मला जाणिव आहे.  मला जे स्वातंत्र्य त्यांनी बहाल केलं आहे त्याचा मी सन्मान करते. त्यांच्या खांद्यावर उभं राहून स्वातंत्र्याची जी उंच भरारी घेत आहे त्यासाठी मी त्यांची सदैव ऋणी आहे. तसेच, मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. परंतु दिखाव्याचे राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्याचा फुगीर अभिमान आणि या सर्वांचा इव्हेंट मला करता येत नाही.  किंबहुना मला करायचा नाही..  माझ्या स्वातंत्र्याच्या पाऊलखुणा प्रत्येक कृतीतून मला मागे ठेवून जायच्या आहेत. पुढची पिढी हाच मुक्त स्वातंत्र्याचा वारसा पुढे घेवून जाईल व आपली खरी संस्कृती जतन करतील. स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे स्वैराचार नव्हे !  स्वातंत्र्याची परिभाषा सरळ जरी असली तरी त्याला कृतीत बांधण्याची जी व्यवस्था मानवाने निर्माण केली आहे ती जटील आहे. मानवाचे मानवासोबत मानवतेचे आचरण,  नाही गुलामी कोणास कोणाची, हाच स्वातंत्र्याचा खरा पाया असावा. स्वतः मुक्तप...

माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे

Image
माझ्यात ही एक बुद्ध दडला आहे  जो त्या तथागताने अचूक हेरला आहे  दुःखावर तो धम्म गिरवतो  करुणेची जो बाग फुलवतो  जीवन मृत्यू सुसंगती घडवतो  खडतर वाट संघर्षाची हसत सर करतो  मानव कल्याणाचे मुक्त विहार होतो  प्रेमाचा विश्व संदेश रुजवितो  त्यागातून मम द्वीप उजळतो  एक गौतम माझ्यात ही विसावतो  व्यवस्थे विरुद्ध जो बंड पुकारतो  सय्यम,शांततेचा विद्रोह घडवतो  माझ्यातील असा बुद्ध तथागत तो  वैचारिक कृतिशीलतेने इथल्या मातीत पेरतो   तुमच्यातील हा बुद्ध कुठे दडतो ?  शोध त्याच्या घेण्या,बघा आज बुद्ध उगवतो ! ( बुद्ध पौर्णिमा(जयंती) निमित्त लिहिलेली ही कविता 🙏 ) - प्राची  फोटो क्रेडिट - जान्हवी  (गव्हर्नमेंट म्युझियम चेन्नई)  

आज का वास्तव

Image
*आज का वास्तव*  बहरा राजा अंध जनता,  विकास यहाँ नही मिलता,  सिर्फ सेठ का काला धंदा चलता, लाचार हर दर रहता,  कौन राम कौन रहीम  यह सिक्का चलता,  जले-मरे-कटे कोई किसे फ़रक हैं पडता, अपने सर हो ताज  और हात मे सत्ता,  बाकी भाड़ में जाये जनता.. -प्राची