Posts

Showing posts from May, 2021

छत्रपती शंभूराजे

Image
आज दि.१४ मे  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव दिन    अवघे ३२ वर्ष आयुष्य लाभलेले सूर्याहून ही तेजस्वी.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वांगाने शोभतील असे उत्तराधिकारी,एकपत्नि,भूमिपुत्रांच्या ह्क्कासाठी लढणारे,लोकराजे,सत्यप्रिय,न्यायप्रिय,धर्मनिरपेक्ष, रणझुंजार,कर्तव्यदक्ष,उत्तम साहित्यिक,कुशल नेत्रुत्व,निर्भीड व अचूक निर्णय क्षमता,कर्तुत्वसंपन्न, शूर,पराक्रमी,राजनीतिज्ञ, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩    जगातील सर्वोत्तम पुत्र,पती,शासक,राजा ही ओळख आपल्या विचार व कृतीतून निर्माण करणारे शंभूराजे.   शंभूराजे लहान असतानाच,आई सईबाई यांचे निधन झाले.धाराऊ या दूध आईच्या दुधावर ते मोठे झाले. जिजाऊंनी जसं शिवरायांना वाढवले,तसेच शंभूराजेंवर देखील संस्कार करून स्वराज्याला दुसरे छत्रपती दिले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मोहिमांमधे बाल शंभूराजे सोबत असत.अनेक संकटांना सामोरं ही जावं लागतं.त्यांनी कोवळ्या वयात स्वराज्यासाठी सोसलेले घाव फार मोठे होते.लहान वयातच राज्यकारभाराचे ज्ञान शंभूराजेंना अवगत झाले होते. शंभूराजे सर्वांगाने तरबेज होते...

कर्मवीर भाऊराव पाटील

Image
काही मानव खरच थोर असतात.संपूर्ण समाजहितासाठी आपलं आयुष्य संघर्षमय व्यथित करतात.कर्मवीर भाऊराव पाटील असेच एक महा मानव ! कर्मवीरांचा जन्म कोल्हापूर येथील कुंभोज या गावचा.त्यांचे मूळ गाव सांगली येथील ऐतवडे बुद्रुक. भाऊराव हे लहानपणापासुन बंडखोर होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले.पुढेचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला राजाराम हाइस्कूलमधे   दाखल झाले.ह्या काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा व अभूतपूर्व कार्याचा प्रभाव पडला.शाहू महाराजांकडून कार्य करण्याची प्रेरणा भाऊराव यांना मिळाली.सुरुवातीला आपल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर दूधगाव येथे दूधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी वस्तीगृह ही येथे स्थापन केले.रयत शिक्षण संस्थेची बीज खरं तर  इथेच रोवली गेली.मी या शिक्षण संस्थेची काही काळ विध्यार्थीनी होते याचा सार्थ अभिमान आहे. पुढे ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कोल्हापूर येथील काले ह्या गावी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.मागासलेल्या,वंचीत  समाजातील मुलांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण,अनावश्यक रुढी परंपरांना फाटा देणं,...

राजर्षी शाहू महाराज

Image
राजर्षी शाहू महाराज  घाटगे कुटुंबातील अवघ्या १० वर्षांच्या  यशवंतला,चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले.यशवंताच नाव शाहू ठेवण्यात आलं.पुढील काही वर्ष शाहूंचे शिक्षण, प्रशिक्षण सुरू राहिले.शिक्षण सुरु असताना वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला.    पुढे शाहू हे छत्रपती शाहू महाराज झाले.आपल्या रयते प्रती त्यांना कणव  होती.त्यांच्या प्रत्येक कार्यातून ही कणव दिसून येतं.बहुजनांसाठी शैक्षणिक कार्य,स्त्रीसन्मानासाठी अनेक ठोस कार्य,जातीयभेद- व्यवस्थेला दुबळ करणारे,सत्यशोधक समाजाचे कार्य,स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग,शेतीला आधुनिकतेची जोड देणारे शेतकऱ्यांचे कैवारी,मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेल्यांना शिक्षण,नौकरी,व्यवसाय हे मार्ग खुले करून समाजात सन्मानाचे स्थान देणारे,आरक्षणाचे जनक,आपल्या करवीर संस्थानात स्वातंत्र्यापूर्वी  समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता अंमलात आणणारे,सर्व घटकांना न्याय मिळवून देणारे,राजांचे राजा,लोककल्याणकारी  राजा,जाणता राजा,राजर्षी अशा अनेक उपाधी आपल्या दूरदृष्टीच्या, कार्याच्या व कर्तृत्वाच...

कार्ल मार्क्स

Image
काही मानव आपल्या आयुष्यात खुप मोठं कार्य उभं करतात.असं की त्या कार्याची दखल केवळ समविचारी नाही,तर विरोधक ही घेतात.त्यांच्या विचारांवर आपल्या हेकेखोरपणाचे इमले हे विरोधक बांधण्याचा प्रयत्न करतात.पण,सर्वसामान्यांनी हे विचार आत्मसात केले की चळवळ उभी रहाते.त्यातून देश उभे रहातात अन हुकूमशहा बारगळतात.या तत्वज्ञानी लोकांची खरी किंमत भविष्यात समजते.जेव्हा त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान खरं होताना दिसत आणि त्यातून मार्ग मात्र आपल्याला सापडत नाही.तो पर्यंत हे तत्वज्ञानी हयात नसतात.हो,पण त्यांनी दाखवलेला मार्ग विचार रूपाने आपल्यात सदैव जागृत असतो.हे लोक त्यामुळेच अमर होतात.कार्ल मार्क्स असाच एक अवलिया,जो तो असताना कमी आणि गेल्यावर जगाला जास्त समजला.जे जे चांगले ते ते घ्यावे,असं म्हंटल जात. कार्ल मार्क्स कडून खुप काही घेण्यासारखं निश्चितच  आहे.हे सर्वसामान्यांनी समजून घेतलं पाहिजे. स्वार्थी,हुकूमशहा,नीतिमत्ता शून्य लोकांनी त्याचा गैरवापरच केला.    कार्ल मार्क्स म्हणतो,‘तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या मार्गांनी जगाचा केवळ अर्थ लावला आहे;पण मुख्य मुद्दा आहे तो जग बदलविण्याचा.’ ते जग कसं आणि को...