Posts

Showing posts from December, 2021

भारतात मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून २१..

Image
भारतातल्या मुलींच्या लग्नाचं वय १८ वरून २१  या वरील विषयाने बरीच चर्चा होताना दिसत आहे.कोणी या निर्णया विरोधात तर कोणी या निर्णयाच्या बाजूने मत व्यक्त करताना दिसत आहे.पण,माझ्या मते या विषयांवर बोलताना त्याला अनुसरून  महत्वाच्या केंद्रित होणाऱ्या मुद्द्याकडे  सर्वांनी लक्ष द्यायला हवं.तो म्हणजे यातून मुली व महिला यांच्या सध्याच्या  स्थितीमधे नक्की कोणती सुधारणा होणार आहे का? नसेल तर ती काय असावी? या वर बोलण अपेक्षित आहे.   तर या विषयाला अनुसरून मी काही मुद्दे मांडत आहे.अर्थात ते परिपूर्ण असतील अस नाही,पण माझ्या अनुभवावरून माझ्या बुद्धीला जे जोग्य वाटलं ते मी इथे मांडत आहे.त्याचा विचार जरूर व्हावा.    हा जो मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यासाठी जो प्रयत्न केंद्रातून होत आहे त्याचे स्वागत करावें का विरोध हे समजेना.आम्ही काही तरी करून दाखवत आहोत या अविर्भावात जर केंद्र असेल तर त्यांना कोणी तरी सांगावं याने मूळ व्यवस्थेत काही बदला होत नाही,तर हा केवळ वरवर केलेला बदल आहे. मूळ मुद्दा ते कसा हाताळणार?    लग्नाचं वय वाढवल्याने मुलींना शिक्षण घेता...

क्रांतिसूर्य नाना पाटील..

Image
६ डिसेंबर..क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिसूर्याचा स्मृतिदिन  ! लहानपणापासून त्यांच्या विषयी खूप ऐकलं आणि वाचल होत.त्यांचा तो रांगडेपणा,करारीपणाचा,आधी स्वातंत्र्यसाठी क्रांती आणि नंतर समाजसुधारक म्हणून स्वतःच उभ आयुष्य झोकून दिलेले,सत्यशोधक, प्रयत्नशील, परिवर्तनकारी,रूबाबदार,गांधीवादी व स्वतःचे विचार असलेले, उच्च विचारसरणी व साधी रहानी असे क्रांतिसिंह नाना पाटील.सतत नवचैतन्य व नवविचार निर्माण करणार व्यक्तिमत्व,तसेच मातीशी असणार नात घट्ट असलेले.  आज देश स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष झालेले असताना देखील आपण मानसिक गुलामगीरी व वैचारिक पारतंत्र्यातून अजून बाहेर पडू शकलो नाही याची खंत वाटते.आज देशाला नानांच्या पुरोगामी कृतिशील विचारसरणीची अवश्यकता आहे.नानांचे वारसदार सर्वपरीने नानांचे विचार समाजा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण,आपण सर्वांनी नानांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार,आचार हे सुधारित समाजाचे व खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारत देशाची निर्मिती करण्यास आचरणात आणणे गरजेचे आहे.प्रस्थापित विध्वंसक प्रवृत्तीला मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रत्येक घरात नानांचे विच...